मुंबई : देशात सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यातील एकजण मुंबईचा रहिवाशी आहे. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हा विषय संवेदनशील असून याचे कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन केले. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हे चुकीचं असल्याचंही वळसे पाटील म्हणाले.