7 सप्टेबर 0222 ला तमिळनाडूतील कन्याकुमारीमधून भारत जोडो यात्रा सुरु झाली होती. 145 दिवसांच्या प्रवासानंतर काँग्रेसची भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. ही भारत जोडो यात्रा 12 राज्यांमधून प्रवास करत जम्मू काश्मीरमध्ये पोहोचली. 4 हजार 80 किलोमीटचा प्रवास करत ही यात्रा आज संपते आहे. श्रीनगरच्या शेर-ए- काश्मीर स्टेडियममध्ये जनसभा झाली. या जनसभेत राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केलं.