मुंबई : आज मंत्रिमडळ बैठकीत रेशनकार्ड (Ration card )धारकांसाठी मोठा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. राज्य सरकारकडून खास दिवाळी पॅकेज देण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील गरिबांची दिवाळी गोड होणार आहे. शिंदे-भाजप सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याने सरकार तर्फे रेशनकार्ड धारकांना 100 रुपयांत प्रत्येकी 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी मंत्रिमडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.