Manoj Jarange: अजित पवारांना संपवण्याचं षडयंत्र, ‘त्या’ दोघांना वडेट्टीवार नावाचा भिडू भेटलाय, जरांगेंचा निशाणा कोणावर?

Manoj Jarange: अजित पवारांना संपवण्याचं षडयंत्र, ‘त्या’ दोघांना वडेट्टीवार नावाचा भिडू भेटलाय, जरांगेंचा निशाणा कोणावर?

Harshada Shinkar | Updated on: Oct 06, 2025 | 9:39 PM

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना संपवण्याचे षडयंत्र छगन भुजबळ आणि परळीच्या मुंडे कुटुंबाने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. भुजबळ यांनी हे आरोप फेटाळत, जरांगेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, जरांगेंनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही गंभीर शब्दांत टीका केली, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे.

भुजबळ यांनी मुंडे कुटुंबाला ओबीसी नेतृत्वासाठी काँग्रेससोबत येऊन अजित पवारांना डॅमेज करण्याचा सल्ला दिला होता., असं मनोज जरांगे पाटलांनी म्हणत एकच खळबळ उडवून दिली. मात्र, छगन भुजबळ यांनी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले. अजित पवार यांना कुणीही संपवू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले. या आरोप-प्रत्यारोपामध्ये जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांचाही उल्लेख केला.

वडेट्टीवार हे अलीकडे “बंदुकीची भाषा” वापरत असून, त्यांना भुजबळ आणि परळीच्या घराण्याचा नवा साथीदार म्हटले. वडेट्टीवार यांनी जरांगेंवर टीका करताना “३७४ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवा” असे म्हटले असल्याचा आरोप जरांगेंनी केला. यावर जरांगेंनी कडवा पलटवार करत, ओबीसी हक्कांसाठी लढताना जीव गेला तरी चालेल, पण हत्येचा आदेश देणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. भुजबळ यांनी जरांगेंना मराठ्यांचे नेते मानण्यास नकार देत, त्यांच्या ज्ञानावर आणि अभ्यासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Published on: Oct 06, 2025 9:38 PM
Follow Us