Manoj Jarange Patil  : नंतर कुणबी प्रमाणपत्र द्या, पण त्याआधी… जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, नेमकं काय म्हणाले?

Manoj Jarange Patil : नंतर कुणबी प्रमाणपत्र द्या, पण त्याआधी… जरांगेंकडून सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, नेमकं काय म्हणाले?

Harshada Shinkar | Updated on: Oct 14, 2025 | 5:26 PM

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला नुकसानीच्या पंचनाम्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावरच कुणबी प्रमाणपत्र वितरीत करावेत, अशी त्यांची मागणी आहे. दिवाळीनंतर शेतकरी प्रश्नांवर बैठक घेण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली असून, मराठवाड्यातील मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे मिळाल्याशिवाय पोलीस भरती न घेण्याची सूचना केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकसानीच्या पंचनाम्यासाठी राज्य सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. “आधी पंचनामे होऊ द्या, त्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र वितरीत करा,” अशी स्पष्ट मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. सरकारने दिवाळीपर्यंत प्रमाणपत्रे वितरीत करावीत, अशी त्यांची अपेक्षा आहे. जर यासाठी आणखी 10-15 दिवसांचा अवधी लागत असेल, तर दिवाळीनंतरही शेतकरी अडचणीत असल्याने प्रमाणपत्र वितरणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे वितरीत झाल्याशिवाय पोलीस भरती प्रक्रिया सुरू करू नये, अशी भूमिका मांडली आहे.

जरांगे म्हणाले की, “आम्ही शेतकऱ्यांची लेकरं आहोत. आधी पंचनामे होऊ द्या. दिवाळी झाल्यावर 15 दिवसांनी प्रमाणपत्र वितरीत केले तरी चालेल, पण ती वितरीत झाली पाहिजेत.” दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या 100 वर्षांत झाली नसतील, अशा सुखाच्या मागण्या आम्ही करत असून, त्या मंजूर करून घ्यायच्या आहेत, असे जरांगे पाटील यांनी अधोरेखित केले.

Published on: Oct 14, 2025 5:26 PM
Follow Us