मुंबई: “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच आतोनात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 125 माणस या अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेली आहेत. महाराष्ट्रातल्या काही भागात पाऊस कमीच पडलाय. या पार्श्वभूमीवर सरकारने योग्य पावल उचलायला हवी होती. तात्काळ मदतीचा निर्णय घ्यायला हवा होता. पण मदत मिळाली नाही. केवळ घोषणा केल्या. त्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही” अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.