मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव अन्… ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार, नेमकं प्रकरण काय?

मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव अन्… ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: May 27, 2026 | 3:29 PM

मुंबईतील मैदाने, ग्रीन झोन आणि मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

मुंबईतील मैदाने, ग्रीन झोन आणि मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबईकरांचे रक्त विकण्याचा हा डाव आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपने यावर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली.

या प्रकरणी ठाकरे गटाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर रक्तपेढीच्या प्रस्तावावर फेरविचार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावावर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गट दोघांचे एकमत असल्याचं समोर आलं आहे. इतकेच नाही, तर हा प्रस्ताव शिंदे सेनेच्या नेत्याने फेरविचारासाठी पाठवला आहे. या संबंध प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

Published on: May 27, 2026 3:26 PM
Follow Us