सावरकरांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही, कारण ते…; भाजपच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Apr 01, 2023 | 1:32 PM

भाजप आणि शिवसेना मिळून सावरकर गौरवयात्रा काढतेय. उद्या संध्याकाळी 5 वाजता मध्य विधानसभा मतदारसंघातून ही यात्रेला सुरुवात होईल. शहराच्या शांततेला गालबोट लागू नाही, अशी आमची मानसिकता आहे. ही यात्रा संपूर्ण 288 मतदारसंघात असणार आहे, असं डॉ. भागवत कराड म्हणालेत.

Follow us on

 छत्रपती संभाजीनगर : सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. सावरकर यांनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. सावरकांना तळपता सूर्य, तेज असं म्हटलं जातं. त्यामुळे माफीचा प्रश्नच नाही, असं केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना वीर सावरकर गौरव यात्रा काढावी असे निर्देश दिले आहेत. सावरकरांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. इंग्रज सरकारने सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. राहुल गांधी मुद्दाम सावरकरांवर टीका करतात, असंही भागवत कराड म्हणाले आहेत. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.