माजी मुख्यमंत्री देवेंद्र सांगितलं की केंद्रानं यंत्रणांचा वापर केला असता अर्ध मंत्रिमंडळ तुरूंगात दिसलं असतं, यावर देवेंद्र फडणवीसांना आम्ही म्हणतो की पूर्ण मंत्रिमंडळ तुरूंगात टाका. जनता पाहतेय, बंगालमध्ये जनतेनं जे उत्तर दिलं तेच उत्तर तुम्हाला इथे मिळेल, असं मलिक म्हणाले.
भ्रष्टाचारासाठी सॉफ्टवेअर केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. त्यावरही नवाब मलिकांनी उत्तर दिलं. “फडणवीस सरकारच्या काळात डिजीटल दलाल होता. फडणवीस सरकारच्या काळात काय- काय घोटाळे झाले हे लवकरच बाहेर काढू”, असा इशारा नवाब मलिकांनी दिला.