मुंबई – राज्यातील कायदा सुरक्षेचा व विशेषता महिलांच्या(Women) सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला सुरक्षित नसेल , महिला जर एकट्या फिरू शकत नसतील. महिला जर या ठिकाणी संरक्षण (Protection)मिळवून स्वतः स्वरूपाचे प्रकार होत असेल, तर आणखी कशावर चर्चा करायची असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Eknath Khadse)यांनी सभागृहात उपस्थित केला . हे सभागृह कशासाठी ? चर्चा झाल्यानंतर उत्तर येईल, उत्तर आल्यानंतर मग तिला काहीतरी मदत मिळेल. तिला स्वरक्षण मिळेल यापेक्षा या तातडीची गरज लक्षात घेता आत्ताच्या आता सभागृहात यापेक्षा कोणते हे महत्त्वाचं काम असू शकत नाही. त्यामुळे सर्वकामकाज बाजूला सारून या विषयाचे तातडीने चर्चा करावी आत्ता चर्चा करावी, अशी मी आपल्याला विनंती करतो असे ते म्हणाले.