गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या ( mahavikas aghadi sarakar) काळात ओबीसींना न्याय मिळाला नाही .फडणवीसांच्या मुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे व्यक्त केले आहे. मला माहीत होत की उद्धव ठाकरे व अजित पवार (Ajit Pawar) हे झारीतील शुक्राचार्य होते ते कधी ही ओबीसी(OBC) समाजाला न्याय देणार नाहीत.जेव्हा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचा निकाल आला तेव्हा एका महिन्याच्या आता ओबीसी आरक्षण मिळाले होते. मात्र त्यांनी हे केलं नाही असा आरोप बावनकुळे यांनी बोलताना केला आहे.