ओमिक्रोनच्या नव्य व्हेरिएंटनं जगाला पुन्हा कामाला लावलं आहे. या संभाव्य धोक्याला ओळखून केंद्र आणि राज्य सरकार जोरदार कामाला लागलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीतही उद्धव ठाकेरेंनी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या रुग्णांवर विशेष नजर ठेवण्यात येतेय. परदेशातून आलेल्यांना सध्या क्वारंटाईन करून ठेवण्यात येत आहे. त्यानंतर त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहेत. जवळपास दीड डझन देशात नव्या विषाणुचे रुग्ण आढळल्याने जगाला धडकी भरली आहे. त्यामुळे अफ्रिकेतून आलेल्या लोकांचा शोधही सध्या सुरू आहे.