त्या शांततेत मला कोकीळेचा आवाज कुहू कुहू ऐवजी कोविड कोविड असा ऐकू येऊ लागला

| Updated on: Mar 09, 2022 | 8:33 PM

23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली, असं राज ठाकरे म्हणाले.

Follow us on

आज आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 16 वर्ष पूर्ण होतात. त्याबद्दल शुभेच्छा देतो.आगामी काळात मनसे जोरदार लढेल, अशी खात्री देतो. तुमच्या घोषणा बंद करा, सगळं भाषणं संपली की एकदम ओरडा, असं राज ठाकरे म्हणाले. कुणी विचार केला नसेल की या प्रकारचे दिवस आपण पाहू, रस्त्यावर शुकशुकाट आहे, घरच्या घर घरात घाबरून बसलेले आहेत. सहज स्पर्श करायला पण भीती वाटायला लागली होती. घरातील माणसानं दिलेला पाण्याचा ग्लास उचलावा की न उचलावा, असं संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. 23 मार्चला लॉकडाऊन लागलं होतं. शिवाजी पार्क समोर होतं, मला फक्त पक्षांचे आवाज ऐकू येत होते. इतकी शांतता मला त्यावेळी अनुभवायला मिळाली. गावाकडे निघालेलो असताना तशा प्रकारची शांतता अनुभवायला मिळत असते. त्या काळात कोकिळेचा कुहू कुहूचा आवाज कोविड कोविड असा ऐकायला येत होता.  नरेंद्र मोदींना पत्र लिहावं वाटतं की महिन्यातले दोन दिवस लॉकडाऊन लावा, अशी मिशकील टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.