राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरण्याचे आवाहन केल्यानंतर मुस्लिम समाजापेक्षा आता हिंदू धर्मातील नागरिकांच्याच भावना दुखावल्या गेल्या आहेत. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे मशिदीवरील भोंग्यावरील अजान बंद झाली असली तरी, हिंदूच्या मंदिरावरील भोंगेही उतरवण्यात आल्याने शिर्डी, पंढरपूर येथील भाविक आता नाराज झाले आहेत. त्यामुळे पंढरपुरातील विठ्ठलाचे भक्तांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर शिर्डीमध्ये मुस्लिम समाजातील नेत्यानीच साई मंदिरावरील भोंगा उतरवू नका आणि काकड आरती भोंग्याविना म्हणू नका अशी विनंती मुस्लिम समाजाने केली आहे.