Breaking | सत्ताधाऱ्यांकडूनच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली

| Updated on: Sep 05, 2021 | 4:58 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली.

Follow us on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजकीय कार्यक्रमांना गर्दी करू नये असे आवाहन केले आहे. त्यानंतरही शिवसेनेचेच सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी भर पावसात गर्दी जमवून मिरवणूक काढली. सांगोल्यातील खवासपूर गावात ही जंगी मिरवणूक पार पडली. गेल्या महिन्यात सांगोल्यात कोरोनाचा प्रकोप सुरु होता. आताही तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा कार्यक्रमांमुळे कोरोना वाढण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम असतानाही राजकीय कार्यक्रमाच्या निमित्ताने गर्दी केली जात आहे. सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांची सांगोल्यातील खवासपूर या गावात चक्क भर‌‌ पावसात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीला गावकऱ्यांची तसंच आसपासच्या गावातील नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती.