एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच आता आशिष शेलारांच्या त्या ट्विटमुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने-सामने येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आज त्या ट्वीटवर बोलताना शिवसेना सचिन अहिर यांनी शेलारांवर टीका केली आहे. तसेच ते म्हणाले, काल ते म्हणत होते की वरळीतले आमदार आमच्या मतांनी निवडून आले आहेत. मग ते कुणाच्या मतांनी आमदार झाले? त्यांचा लोकसभेचे खासदार कोणाच्या मतावर झाला. ज्या मतदार संघातून ते निवडून आले तो आधी कोणाचा बालेकिल्ला होता हे पहावं असंही अहिर यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्हाला शपथपत्रांबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही. काळजी ही करण्याची गरज नाही. वरळीतला शिवसैनिक वरळीतला मतदार हा निष्ठेने शिवसैनिक आहे.