Jalgaon : गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. धरणातून गिरणा नदी पात्रात 7128 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले आहेत. धरणातून गिरणा नदी पात्रात 7128 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणात होणारी पाण्याची आवक बघून विसर्ग वाढवायचा की कमी करायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.
Published on: Jul 25, 2022 09:57 AM
