माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून आतापर्यंत चार समन्स बजावण्यात आले आहेत. मात्र, अद्याप अनिल देशमुख चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे ईडीलाही अनिल देशमुख यांचा ठावठिकाणा लागत नाही. दरम्यान, अनिल देशमुख यांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. देशमुख हे भारतातच आहेत. मात्र, ईडीकडून त्यांना सतत समन्स बजावण्यात येत आहेत, असं नवाब मलिक म्हणाले.