मुंबई : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यातील सर्व नद्या तुडूंब भरल्या आहेत. तसेच या पावसामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या पुरस्थितीला देवेंद्र फडणवीस यांची जलयुक्त शिवार ही योजना जबाबदार असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. तर दुसरीकडे हा दावा करणे म्हणजे हस्यापस्पद आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिलीय.