मुंबई: “एकनाथ शिंदे सरकारवर अजूनही टांगती तलवार आहे. ते जर अपात्र ठरले, तर सरकारच राहणार नाही. सरकार 1 ऑगस्टपर्यंत अस्थिर परिस्थितीतच चालेल. मंत्रिमंडळ विस्तार करावा लागेल कदाचित, कारण दोन मंत्र्यांना सगळं काम करता येणार नाही. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. जैसे थे परिस्थिती म्हटलीय, त्यात कोर्ट अंतरिम आदेशात जैसे थे परिस्थिती काय? त्याची माहिती देईल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.