मोह नसलेले मुख्यमंत्री लाभले

| Updated on: Jun 25, 2022 | 10:45 PM

आपले मुख्यमंत्री वर्षामध्ये राहायला असताना त्यांनी नेहमीच कामात गुंतवून घेतले होते. मात्र ज्यावेळी बंडखोरी झाल्यानंतर वर्षा सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळी कोणताही मोह न बाळगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ सोडला.

Follow us on

ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार आपले नव्हतेच, पक्षातील घाण गेली असं मत त्यांनी व्यक्त करत गेली ती घाण गेली असा घणाघातही त्यांनी बंडखोर आमदारांवर त्यांनी केले. ज्या बंडखोर आमदारांनी कारणं सांगत बंडखोरी केली आहे, त्यांची किती तरी कामं आपण केली आहेत, आणि जो जनतेचा निधी आहे, तो जनतेला तात्काळ दिला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. आपले मुख्यमंत्री वर्षामध्ये राहायला असताना त्यांनी नेहमीच कामात गुंतवून घेतले होते. मात्र ज्यावेळी बंडखोरी झाल्यानंतर वर्षा सोडण्याचा प्रसंग आला त्यावेळी कोणताही मोह न बाळगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ सोडला.