मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट (Water Shortage) ओढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा २२ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी साठा कमी असल्याने मुंबईत पाणी कपातीचं संकट मुंबईकरांवर ओढवणार असल्याची शक्यता यावरून वर्तविली जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा २२ टक्के पाणी साठा उरला असल्याने अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाणी कमी असल्याने मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे.