गेल्या दोन दशकापासून राजकीय आणि सामाजिक विषयांवर रिपोर्टिंग आणि लेखन. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय आणि भारतीय सिनेमा, वैश्विक राजकारण, सांस्कृतिक आणि मानवीय स्वरुपांवरही सातत्याने लिखाण केलं आहे. पाणिनि आनंद याांची डीजिटल मीडियाचे विशेषज्ञ म्हणून ओळख आहे. परंतु, एक पत्रकार म्हणून भाजप, काँग्रेस आणि उत्तर भारताच्या राजकारणातील प्रमुख राजकीय पक्षांना अगदी जवळून पाहण्याचा आणि समजून घेण्याचा त्यांचा अनुभव राहिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दलित राजकारण, मागासवर्गांशी संबंधित मुद्दे, ग्रामीण भारत आणि आधुनिक भारतीय समाज आदी त्यांच्या लेखनाचे मुख्य विषय आहेत.
परिपक्वता, नियंत्रण आणि वारसा… 2024मधील राहुल गांधींमध्ये बदल झालाय?
गांधी कुटुंब आणि काँग्रेसच्या अंगणात एका लाजाळू मुलाची तोडकीमोडकी हिंदी आता एक परिपक्व राजकीय भाषा बनली आहे. या नव्या आवतारात पार्टीवर नियंत्रणही आहे आणि राजकीय कौशल्य सुद्धा आहे.
- पाणिनि आनंद
- Updated on: Jun 6, 2024
- 2:02 pm
रामलल्लाच्या मंचावरून काय होती मोदींची भूमिका?; सरसंघचालक भागवतांचा काय होता हेतू?
राजा राम, हे सर्व समावेशी आहेत. समद्रष्टा आहेत. समष्टिबोध असलेले आहेत. राजा राम कुणालाही कमी लेखत नाही. तो गांधीही आहे आणि संघही आहे. तो साधूतही आहे आणि गृहस्थांमध्येही आहे. जातींना तोडून तो रामज्योतीने लोकांना एका धाग्यात ओवून राजकारणात विजयाचं आणखी एक उत्तरकांड लिहील.
- पाणिनि आनंद
- Updated on: Jan 23, 2024
- 2:08 pm
वाद, अंतर्गत कलह आणि विखूरलेपण… 2024मध्ये भाजप विरोधात काँग्रेस लढणार कशी?
काँग्रेस आपल्या बळावर भाजप आणि मोदी सरकारला आव्हान देत आहे, हे मोठं धाडस आहे. विरोधकांकडून जनता हीच अपेक्षा ठेवून आहे. परंतु, हात कमकुवत आहेत. मूठ उघडलेली आहे आणि हाताच्या पाचही बोटांमध्ये काहीच ताळमेळ नाही. या हाताची वज्रमूठ करावी याचं भान त्यांना राहिलेलं नाही. या सर्व परिस्थितीत काँग्रेस 2024च्या युद्धाला कसे सामोरे जाणार? कशाच्या बळावर हे युद्ध जिंकणार? की पुन्हा एकदा या युद्धात शरणागती पत्करणार?
- पाणिनि आनंद
- Updated on: Dec 4, 2023
- 4:17 pm