Maharashtra News LIVE : पाणी टंचाईने मुंबईकर नागरिक हैराण
Maharashtra News LIVE : हिंगोली-औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांड्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी वृद्ध महिला व लहानग्यांना रानावनात भटकंती करावी लागत आहे. यासह देश-विदशे,मनोरंजन, क्रीडा, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचता येतील. दिवसभर फॉलो करा हा ब्लॉग.

LIVE NEWS & UPDATES
-
छत्रपती संभाजीनगर – पहाटे ४ वाजता गाडीला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
छत्रपती संभाजीनगर शहरातील देवगिरी हिल्स परिसरात पहाटे चार वाजताच्या सुमारास एका वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पंडित नेहरू महाविद्यालयाच्या मागील बाजूस उभ्या असलेल्या गाडीला अचानक आगा लागील. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही वा कणीही जखमीही झालेलं नाही. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवली.
-
सिंहगडावर पर्यटक दरीत घसरून पडला, रेस्क्यू टीमकडून सुखरूप बचाव
सिंहगड किल्ल्यावर एका पर्यटकाचा पाय घसरून तो सुमारे 70 फूट खोल दरीत पडल्याची घटना काल घडली. योगेश मोहन शितोळे असे जखमी पर्यटकाचे नाव आहे. मात्र हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम व हवेली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने सुमारे 150 फूट खोल दरीत अडकलेल्या शितोळे यांना सुरक्षित बाहेर काढले. रेस्क्यू टीमने रात्रीच बचाव कार्य राबवून तरुणाचे प्राण वाचवले.
-
-
जळगाव – एटीएमची अदलाबदल करून 90 हजारांची फसवणूक
जळगावात एटीएमची अदलाबदल करून एकाची ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जळगावातील पांडे चौकातील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये हा प्रकार घडला . मदतीचा बहाणा करून एका भामट्याने अत्यंत चलाखीने एटीएम कार्ड बदलून फसवणूक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-
बीड- पाण्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बीड- वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथे शेतातील पाण्याच्या कारणावरून पार्वती तोगे या महिलेला भावकीतीलच लोकांनी लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चौघांविरुद्ध डवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
पंजाबमध्ये 3 तासांत 2 स्फोट, अमृतसर-जालंधर हादरलं
पंजाबमधील अमृतसर आणि जालंधर येथे काल रात्री उशिरा झालेल्या दोन मोठ्या स्फोटांमुळे घबराट पसरली आहे. अमृतसरमधील खासा लष्करी छावणीबाहेर आणि जालंधरमधील बीएसएफ मुख्यालयाबाहेर हे संशयास्पद स्फोट झाले. तपासाअंती, यामध्ये आयईडी (IED) या स्फोटक उपकरणाचा वापर झाल्याचे सूचित होत आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
-
-
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’ आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ
नाशिकमध्ये आज ‘कुंभउद्योग संगम’ आणि जिल्हा गुंतवणूक समिटचा भव्य शुभारंभ होणार आहे. उद्योग समिटमधून 15 ते 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार होण्याची शक्यता आहे. – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत विकासाला मोठी चालना मिळणार. हॉटेल गेट वे येथे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार.
मुंबईतील कुर्ला एलवार्ड, घाटकोपर आणि आसपासच्या परिसरात पाणी टंचाईने नागरीक हैराण झाले आहेत. आज संध्याकाळी 6 पर्यंत पुरवठा बंद राहणार . शहरातील अनेक भागांत आज पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय मनपाकडून घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान पुण्यातील पाणी कपात 31 मे पर्यंत टळली आहे. मुंबईच्या पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे शहरात 31 मे पर्यंत कोणतीही पाणी कपात केली जाणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय महापौर मंजुषा नागपूर यांनी मंगळवारी घेतला. जालनाचे शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर यांनी 12 नगरसेवकांना सोबत घेत एकनाथ शिंदेंची भेट घेतली. खोतकर यांनी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्यासह शिवसेनेच्या 12 नगरसेवकांना घेऊन मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल संध्याकाळी भेट घेत जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
Published On - May 06,2026 8:11 AM
