AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : लाज वाटली पाहिजे, रामदास कदमांना जबर किंमत मोजावी लागणार – राऊत संतापले

शिवसेना शिंदे गटाचे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर विविध आरोप केले. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवादग साधताना रामदास कदम यांचे आरोप खोडू काढत त्यांना सडेतोड शब्दांत सुनावलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करणं कदम यांना महागात पडेल, असा इशाराच राऊत यांनी दिला.

Sanjay Raut : लाज वाटली पाहिजे, रामदास कदमांना जबर किंमत मोजावी लागणार - राऊत संतापले
संजय राऊत संतापलेImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 10:58 AM
Share

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं असून कदम यांनी  कालही त्यांच्या विधानाची पुनरावृत्ती सुरूच ठेवली. उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी काल पुन्हा विविध आरोप केले.  तसेच कदम यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मा. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर हे जी विटंबना करत आहेत, त्याची जबर किंमत रामदस कदम यांना मोजावी लागेल असा इशाराच राऊतांनी दिला.  

काय म्हणाले राऊत ?

दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवण्यासा शिवसेनेतील लोकांचा सातत्याने विरोध होता, एक म्हणजे रामदास कदम आणि दुसऱ्या नीलम गोऱ्हे.नीलम गोऱ्हेंचं पक्षातलं योगदान काय हा प्रश्न कायम विचारला गेला. आणि रामदास कदम यांना आमदार, मंत्री म्हणून इतके वर्षं संधी मिळाली आहे, त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवायचं , असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना पक्षातून विचारले गेले. तरीही उद्धव ठाकरे हे दयाबुद्धीचे असल्याने त्यांनी 2 वेळा त्यांना (रामदास कदम), 12 वर्ष विधानपरिषदेवर पाठवलं. अशा माणसाने ठाकरे कुटुंबाप्रती कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण ते गरळ ओकत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर हे लोकं जी विटंबना करत आहेत, त्याची जबर किंमत रामदस कदम यांना मोजावी लागेल.

लाज वाटली पाहिजे यांना..

ही किंमत कोणत्याही प्रकारची असेल, कायदेशीर असेल, पब्लिक असेल, नियतीची असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात तुम्ही अशी विधानं करत आहात, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ते जो संपूर्ण घटनाक्रम सांगत आहेत, तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. शेवटचा जो क्रिटिकल काळ होता, मी तिथे शेवटच्या क्षणापर्यंत होतो. हे लोकं कुठे होते ? कोणीही नव्हतं तिथे. आम्ही मोजकी लोकं होतं तिथे, त्यामुळे तिथे काय परिस्थिती होती, या लोकांची काय अवस्था होती ते पूरेपूर माहीत आहे.आणि तुम्ही आता याचा याप्रकारे उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मजल गेली.तर तुम्हाला याची जबर किंमत मोजावीच लागेल असे राऊतांनी पुन्हा सुनावलं. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवलं.  फक्त टाळ्या मिळवण्यासाठी वागले, पण त्यांना टाळ्या मिळाल्या नाही, महाराष्ट्र थुंकतोय त्यांच्यावर अश शब्दांत राऊत यांनी कदम यांच्यावर हल्ला चढवला.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत