AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती हादरलं! नऊ महिन्यांत 60 अल्पवयीन मुली बनल्या माता, मेळघाटात नेमकं चाललंय तरी काय?

अमरावती जिल्ह्यात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे; ९ महिन्यांत ६० अल्पवयीन मुली माता बनल्या. बालविवाह आणि लैंगिक अत्याचारामुळे हे घडले. मेळघाटमधील शैक्षणिक मागासलेपण, गरिबी आणि अज्ञान ही प्रमुख कारणे आहेत.

| Updated on: Nov 03, 2025 | 5:45 PM
Share
अमरावती जिल्ह्यामध्ये बालविवाह आणि लैंगिक अत्याचाराची एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या नोंदीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत अठरा वर्षांखालील 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये बालविवाह आणि लैंगिक अत्याचाराची एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाच्या नोंदीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत अठरा वर्षांखालील 60 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली आहे.

1 / 8
या मुलींवर बालविवाह आणि लैंगिक अत्याचारातून अवघ्या काही वर्षांतच मातृत्व लादले गेले असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अल्पवयीन मातांपैकी अनेकजणी बालविवाह किंवा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.

या मुलींवर बालविवाह आणि लैंगिक अत्याचारातून अवघ्या काही वर्षांतच मातृत्व लादले गेले असल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अल्पवयीन मातांपैकी अनेकजणी बालविवाह किंवा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.

2 / 8
अल्पवयीन मुलीशी केलेला विवाह किंवा तिच्यावर केलेला लैंगिक अत्याचार हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे 60 कुमारी माता आणि 60 गुन्हे दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाने ही धक्कादायक माहिती पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभागाला तातडीने कळवली आहे.

अल्पवयीन मुलीशी केलेला विवाह किंवा तिच्यावर केलेला लैंगिक अत्याचार हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे 60 कुमारी माता आणि 60 गुन्हे दाखल झाले आहेत. रुग्णालय प्रशासनाने ही धक्कादायक माहिती पोलीस विभाग आणि महिला व बालविकास विभागाला तातडीने कळवली आहे.

3 / 8
या माहितीनंतर, संबंधित मुलींची सखोल चौकशी करून त्यांच्या प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

या माहितीनंतर, संबंधित मुलींची सखोल चौकशी करून त्यांच्या प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

4 / 8
या घटनेमागे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासीबहुल भागातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे एक प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास येत आहे. मेळघाटमध्ये आजही शिक्षणाचा मोठा अभाव आहे. शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही, ज्यामुळे बालविवाहाचे प्रमाण येथे लक्षणीय आहे.

या घटनेमागे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासीबहुल भागातील सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे एक प्रमुख कारण असल्याचे निदर्शनास येत आहे. मेळघाटमध्ये आजही शिक्षणाचा मोठा अभाव आहे. शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झालेली नाही, ज्यामुळे बालविवाहाचे प्रमाण येथे लक्षणीय आहे.

5 / 8
तसेच अज्ञान, गरिबी आणि रूढीवादी परंपरांमुळे अल्पवयीन मुलींचे लग्न लावले जाते, ज्यामुळे त्या कमी वयातच गर्भवती होतात आणि त्यांना कुमारी माता बनावे लागते. दरम्यान अल्पवयीन मुलीशी (१८ वर्षांखालील) विवाह करणाऱ्या २१ वर्षांवरील पुरुषास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तसेच अज्ञान, गरिबी आणि रूढीवादी परंपरांमुळे अल्पवयीन मुलींचे लग्न लावले जाते, ज्यामुळे त्या कमी वयातच गर्भवती होतात आणि त्यांना कुमारी माता बनावे लागते. दरम्यान अल्पवयीन मुलीशी (१८ वर्षांखालील) विवाह करणाऱ्या २१ वर्षांवरील पुरुषास दोन वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

6 / 8
जाणूनबुजून बालविवाह घडवून आणणारे, सोहळा पार पाडणारे किंवा प्रोत्साहन देणारे आई-वडील, नातेवाईक, पुरोहित अशा सर्व संबंधितांनाही याच शिक्षेची तरतूद आहे.

जाणूनबुजून बालविवाह घडवून आणणारे, सोहळा पार पाडणारे किंवा प्रोत्साहन देणारे आई-वडील, नातेवाईक, पुरोहित अशा सर्व संबंधितांनाही याच शिक्षेची तरतूद आहे.

7 / 8
दरम्यान जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागावर आता या 60 प्रकरणांमध्ये त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचा मोठा दबाव आहे. केवळ गुन्हे दाखल करून नव्हे, तर मेळघाटसारख्या दुर्गम भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि जनजागृतीचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून ही सामाजिक समस्या मुळापासून नष्ट करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागावर आता या 60 प्रकरणांमध्ये त्वरित आणि कठोर कारवाई करण्याचा मोठा दबाव आहे. केवळ गुन्हे दाखल करून नव्हे, तर मेळघाटसारख्या दुर्गम भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि जनजागृतीचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवून ही सामाजिक समस्या मुळापासून नष्ट करणे हे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

8 / 8
Follow Us
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?