AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य, अनेक प्रमुख मार्ग अद्यापही पाण्याखालीच

kolhapur flood update: गेल्या 48 तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात देखील पावसाने उघडीत दिली आहे. तसेच धरणातून सोडण्यात आलेले पाणी थांबवले आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होत असल्याने तीन ते चार दिवसांपासून पाण्याखाली केलेल्या महत्त्वाच्या मार्गावरील पाणी आता उतरू लागले आहे. परंतु दुसरीकडे कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत.

| Updated on: Jul 30, 2024 | 10:57 AM
Share
कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत. पुराच्या पाण्याने गवताचे अख्ख शेत रस्त्यावर आले आहे. शेतकऱ्याने गवताच्या रानाला लावलेल्या कुंपणासह शेतच रस्त्यावर आले आहे.

कोल्हापुरातील पूर ओसरल्यानंतर आता पुराची भीषणता दाखवणारी दृश्य समोर येत आहेत. पुराच्या पाण्याने गवताचे अख्ख शेत रस्त्यावर आले आहे. शेतकऱ्याने गवताच्या रानाला लावलेल्या कुंपणासह शेतच रस्त्यावर आले आहे.

1 / 5
कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आंबेवाडी गावाजवळ शेत जमीन वाहून आली आहे. वाहून आलेल्या या गवताच्या शेताचा आता वाहतुकीला अडथळा ठरला आहे. कोल्हापुरातल्या आंबेवाडीमधील पूर सुरू लागल्यानंतर आता पुन्हा आपल्या घरी परतू लागले.  आंबेवाडी येथील नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आंबेवाडी गावाजवळ शेत जमीन वाहून आली आहे. वाहून आलेल्या या गवताच्या शेताचा आता वाहतुकीला अडथळा ठरला आहे. कोल्हापुरातल्या आंबेवाडीमधील पूर सुरू लागल्यानंतर आता पुन्हा आपल्या घरी परतू लागले. आंबेवाडी येथील नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

2 / 5
कुरुंदवाड भागात पूरपरिस्थिती तशीच आहे. पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहेत. या भागातील रस्ते कधी मोकळे होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कुरुंदवाड भागात पूरपरिस्थिती तशीच आहे. पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त भागांना थोडासा दिलासा मिळाला आहे. कुरुंदवाड, नृसिंहवाडीसह अनेक प्रमुख मार्ग अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहेत. या भागातील रस्ते कधी मोकळे होतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

3 / 5
कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील आंबेवाडी,चिखली, केरली या गावातील लोक गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोल्हापूरकडे येऊ शकले नव्हते. मात्र आताचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाली असली तरी होत असलेल्या पाण्याला मोठा प्रवाह आहे. त्यामुळे नागरिकांनी धोका न पत्करता पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोल्हापूर रत्नागिरी रोडवरील आंबेवाडी,चिखली, केरली या गावातील लोक गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोल्हापूरकडे येऊ शकले नव्हते. मात्र आताचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र रस्त्यावरील पाणी पातळी कमी झाली असली तरी होत असलेल्या पाण्याला मोठा प्रवाह आहे. त्यामुळे नागरिकांनी धोका न पत्करता पुराच्या पाण्यातून प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

4 / 5
कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शिरोळ तालुका पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो दोन्ही जिल्ह्यातील पूर कमी होत असला तरी  शेवटच्या टप्प्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये 43 गावे व दोन शहरांना मोठ्या प्रमाणात बसत असतो.

कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शिरोळ तालुका पुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असतो दोन्ही जिल्ह्यातील पूर कमी होत असला तरी शेवटच्या टप्प्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये 43 गावे व दोन शहरांना मोठ्या प्रमाणात बसत असतो.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.