AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी खड्डे, आता धूळ…. कल्याण-डोंबिवलीकरांवर एकाच वेळी दोन संकट, पाहा Photos

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी आता नागरिकांसाठी नवे संकट बनली आहे. सिमेंट मिश्रित खडी आणि मातीचा वापर करून बुजवलेले खड्डे पावसाने उखडल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण करत आहेत.

| Updated on: Oct 10, 2025 | 4:28 PM
Share
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यावरील महापालिकेच्या तात्पुरत्या उपायांमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती सध्या कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवर दिसून येत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यावरील महापालिकेच्या तात्पुरत्या उपायांमुळे नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती सध्या कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांवर दिसून येत आहे.

1 / 8
त्यातच आता खड्ड्यांनी हैराण झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता खड्डे बुजवण्याच्या कामातून निर्माण झालेल्या धुळीच्या भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे श्वसनाचे त्रास आणि आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

त्यातच आता खड्ड्यांनी हैराण झालेल्या कल्याण-डोंबिवलीकरांना आता खड्डे बुजवण्याच्या कामातून निर्माण झालेल्या धुळीच्या भयंकर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे श्वसनाचे त्रास आणि आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

2 / 8
यंदाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते. नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आणि आंदोलने झाल्यानंतर महापालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट मिश्रित खडी आणि मातीचा वापर करून तात्पुरती मलमपट्टी केली.

यंदाच्या अतिवृष्टीमुळे शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते. नागरिकांकडून वाढत्या तक्रारी आणि आंदोलने झाल्यानंतर महापालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी सिमेंट मिश्रित खडी आणि मातीचा वापर करून तात्पुरती मलमपट्टी केली.

3 / 8
पण पुढील काळात पडलेल्या पावसाने ही मलमपट्टी काही दिवसांतच उखडली आणि रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे महापालिकेच्या या तात्पुरत्या दुरुस्तीचा गंभीर परिणाम आता दिसू लागला आहे.

पण पुढील काळात पडलेल्या पावसाने ही मलमपट्टी काही दिवसांतच उखडली आणि रस्त्यांची अवस्था पुन्हा जैसे थे झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे महापालिकेच्या या तात्पुरत्या दुरुस्तीचा गंभीर परिणाम आता दिसू लागला आहे.

4 / 8
खड्ड्यांमध्ये टाकलेली माती आणि खडीचा बारीक चुरा रस्त्यावर आला आहे. वाहनांच्या ये-जा मुळे ही माती उडून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. सकाळ असो वा संध्याकाळ, शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

खड्ड्यांमध्ये टाकलेली माती आणि खडीचा बारीक चुरा रस्त्यावर आला आहे. वाहनांच्या ये-जा मुळे ही माती उडून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे. सकाळ असो वा संध्याकाळ, शहराच्या अनेक भागांत रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

5 / 8
या धुळीमुळे रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना नाकावर रुमाल किंवा मास्क बांधल्याशिवाय प्रवास करणे शक्य होत नाही. तसेच दिवसाही अनेक रस्त्यांवर दृश्यमानता कमी होत आहे.

या धुळीमुळे रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. दुचाकीस्वारांना नाकावर रुमाल किंवा मास्क बांधल्याशिवाय प्रवास करणे शक्य होत नाही. तसेच दिवसाही अनेक रस्त्यांवर दृश्यमानता कमी होत आहे.

6 / 8
सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फुफ्फुसांचे आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ही धूळ अत्यंत धोकादायक ठरत आहे.

सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फुफ्फुसांचे आणि श्वसनाचे विकार असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ही धूळ अत्यंत धोकादायक ठरत आहे.

7 / 8
सध्या धुळीमुळे दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे तातडीने लक्ष द्यावे. केवळ खड्डे बुजवून थांबू नये, तर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. कल्याण-डोंबिवलीकरांना या खड्डे आणि धुळीच्या दुष्टचक्रातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी तीव्रपणे केली आहे.

सध्या धुळीमुळे दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे तातडीने लक्ष द्यावे. केवळ खड्डे बुजवून थांबू नये, तर रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी ठोस पाऊले उचलावीत. कल्याण-डोंबिवलीकरांना या खड्डे आणि धुळीच्या दुष्टचक्रातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी तीव्रपणे केली आहे.

8 / 8
Follow Us
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदार...
Video | अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार
महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित,
Maharashtra Devasthan | महाराष्ट्रतील देवस्थान जमिनीबाबत सरकारचं मोठं पाऊल, तो निर्णय स्थगित, नेमकं प्रकरण काय?
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा
भाजपला मोठा धक्का; महिला शहराध्यक्षांसह संपूर्ण कार्यकारिणीचा थेट राजीनामा, पक्षांतर्गत वाद अचानक उफाळला