AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिने मला धर्मांतर करायला सांगितलं, नातं संपुष्टात..; अभिनेत्याचा खुलासा

बिग बॉसच्या घरात अभिनेता कुशल टंडन आणि गौहर खान यांच्यात प्रेमाची कळी फुलली. घराबाहेर आल्यानंतरही दोघं एकमेकांना डेट करू लागले. परंतु त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. कुशलने एका मुलाखतीत त्याच्या ब्रेकअपमागील कारण सांगितलं होतं.

| Updated on: May 26, 2025 | 9:45 AM
Share
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला तो सध्या डेट करतोय. पण शिवांगीच्या आधी त्याच्या आयुष्यात अभिनेत्री गौहर खान होती.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला तो सध्या डेट करतोय. पण शिवांगीच्या आधी त्याच्या आयुष्यात अभिनेत्री गौहर खान होती.

1 / 6
'बिग बॉस' विजेती गौहर खान आणि कुशल टंडनचं रिलेशनशिप सर्वश्रुत होतं. परंतु काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. यामागचं कारण खुद्द कुशलने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'बिग बॉस' विजेती गौहर खान आणि कुशल टंडनचं रिलेशनशिप सर्वश्रुत होतं. परंतु काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. यामागचं कारण खुद्द कुशलने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

2 / 6
कुशलने गौहरसोबत ब्रेकअपचं कारण धर्म असल्याचं सांगितलं आहे. धर्मावरून समस्या होती, म्हणून आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला, असं तो म्हणाला.

कुशलने गौहरसोबत ब्रेकअपचं कारण धर्म असल्याचं सांगितलं आहे. धर्मावरून समस्या होती, म्हणून आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला, असं तो म्हणाला.

3 / 6
"गौहरसोबत माझं नातं खूप चांगलं होतं. पण जेव्हा धर्मावरून काही समस्या जाणवल्या, तेव्हा मी त्यातून मार्ग काढण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्दैवाने आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला. कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलोच नव्हतो", अशा शब्दांत कुशल व्यक्त झाला.

"गौहरसोबत माझं नातं खूप चांगलं होतं. पण जेव्हा धर्मावरून काही समस्या जाणवल्या, तेव्हा मी त्यातून मार्ग काढण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्दैवाने आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला. कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलोच नव्हतो", अशा शब्दांत कुशल व्यक्त झाला.

4 / 6
"गौहरने मला माझा धर्म बदलण्यास सांगितलं होतं. माझ्यासाठी ते शक्य नव्हतं. प्रेम सर्वकाही आहे परंतु आयुष्यात फक्त ती एकच गोष्ट नाही", असं त्याने स्पष्ट केलं. कुशलच्या या मुलाखतीनंतर नेटकऱ्यांनी गौहरला खूप ट्रोल केलं होतं. त्यावर गौहरनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.

"गौहरने मला माझा धर्म बदलण्यास सांगितलं होतं. माझ्यासाठी ते शक्य नव्हतं. प्रेम सर्वकाही आहे परंतु आयुष्यात फक्त ती एकच गोष्ट नाही", असं त्याने स्पष्ट केलं. कुशलच्या या मुलाखतीनंतर नेटकऱ्यांनी गौहरला खूप ट्रोल केलं होतं. त्यावर गौहरनेही सडेतोड उत्तर दिलं होतं.

5 / 6
"मी मुस्लीम आहे आणि कोणीच आपल्याला आपले अधिकार मिळवण्यापासून दूर करू शकत नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, इथे लोकशाही आहे. इथे हुकुमशाही चालत नाही", असं ती म्हणाली होती. कुशलशी ब्रेकअपनंतर गौहरने झैद दरबारशी लग्न केलं.

"मी मुस्लीम आहे आणि कोणीच आपल्याला आपले अधिकार मिळवण्यापासून दूर करू शकत नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, इथे लोकशाही आहे. इथे हुकुमशाही चालत नाही", असं ती म्हणाली होती. कुशलशी ब्रेकअपनंतर गौहरने झैद दरबारशी लग्न केलं.

6 / 6
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.