AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेपूर्वीच माईंड गेम सुरु, रिकी पाँटिंगने वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं तर…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत जाण्यापूर्वी टीम इंडियाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. यात बांगलादेशविरुद्ध दोन सामने, न्यूझीलंडविरुद्ध तीन सामने आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामने खेळायचे आहेत. भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी काहीही करून पाच सामने जिंकावे लागणार आहेत.

| Updated on: Aug 13, 2024 | 6:36 PM
Share
2024 वर्षाच्या शेवटी भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मागच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तिसऱ्यांदा काय कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

2024 वर्षाच्या शेवटी भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यात पाच सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मागच्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तिसऱ्यांदा काय कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाल उर्वरित 10 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. जर तसं झालं तर अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होईल. यासाठी भारताला बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे सोपं आव्हान असणार आहे. पण या मालिकांमध्ये काही गडबड झाली तर ऑस्ट्रेलियात कस लागेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाल उर्वरित 10 पैकी 5 कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. जर तसं झालं तर अंतिम फेरीचं तिकीट पक्कं होईल. यासाठी भारताला बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे सोपं आव्हान असणार आहे. पण या मालिकांमध्ये काही गडबड झाली तर ऑस्ट्रेलियात कस लागेल.

2 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने या दौऱ्यापूर्वीच भाकित वर्तवलं असून खळबळ उडाली आहे. रिकी पाँटिंगच्या दाव्यानुसार ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत करेल. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित बिघडू शकतं.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने या दौऱ्यापूर्वीच भाकित वर्तवलं असून खळबळ उडाली आहे. रिकी पाँटिंगच्या दाव्यानुसार ऑस्ट्रेलिया भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने पराभूत करेल. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित बिघडू शकतं.

3 / 6
आयसीसी रिव्ह्यूत संजना गणेशनसोबत चर्चा करताना पाँटिंगने सांगितलं की, 'या मालिकेत चुरशीची लढाई असणार आहे. मागच्या दोन मालिकांमध्ये जे काही झाले त्याची परतफेड करावी लागेल. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध स्वत:ला सिद्ध करावं लागेले. पाच कसोटी सामने होणार आहेत. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे.'

आयसीसी रिव्ह्यूत संजना गणेशनसोबत चर्चा करताना पाँटिंगने सांगितलं की, 'या मालिकेत चुरशीची लढाई असणार आहे. मागच्या दोन मालिकांमध्ये जे काही झाले त्याची परतफेड करावी लागेल. ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध स्वत:ला सिद्ध करावं लागेले. पाच कसोटी सामने होणार आहेत. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे.'

4 / 6
'यापूर्वी फक्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. आता पाच सामन्यांची मालिका असल्याने उत्साह वाढला आहे. मला माहिती नाही सामने ड्रॉ होतील की नाही. पण ऑस्ट्रेलिया जिंकणार हे निश्चित आहे. कुठे सामना ड्रॉ होणार, तर कुठे हवामानाचा फटका बसेल. पण मला खात्री आहे ऑस्ट्रेलिया 3-1 ने जिंकेल.', असं रिकी पॉटिंग म्हणाला.

'यापूर्वी फक्त कसोटी सामने खेळले गेले आहेत. आता पाच सामन्यांची मालिका असल्याने उत्साह वाढला आहे. मला माहिती नाही सामने ड्रॉ होतील की नाही. पण ऑस्ट्रेलिया जिंकणार हे निश्चित आहे. कुठे सामना ड्रॉ होणार, तर कुठे हवामानाचा फटका बसेल. पण मला खात्री आहे ऑस्ट्रेलिया 3-1 ने जिंकेल.', असं रिकी पॉटिंग म्हणाला.

5 / 6
2014-2015 पासून भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेत पराभूत झालेली नाही. भारताने 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यात दोन विजय ऑस्ट्रेलियात झाले आहेत. चार कसोटी मालिकेतील 16 सामन्यात 8 भारताने, तर 4 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारताने या मालिका 2-1 ने जिंकल्या आहेत. दुसरीकडे, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला धोबीपछाड दिला होता.

2014-2015 पासून भारतीय संघ बॉर्डर गावस्कर स्पर्धेत पराभूत झालेली नाही. भारताने 4 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. यात दोन विजय ऑस्ट्रेलियात झाले आहेत. चार कसोटी मालिकेतील 16 सामन्यात 8 भारताने, तर 4 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. भारताने या मालिका 2-1 ने जिंकल्या आहेत. दुसरीकडे, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला धोबीपछाड दिला होता.

6 / 6
Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.