AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : रणजी ट्रॉफी बंद करा! बंगालच्या कर्णधाराने सोशल मीडियावर संताप व्यक्त करत वाचला पाढा

रणजी ट्रॉफीचं महत्त्व कमी होत असल्याने बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच देशांतर्गत रणजी स्पर्धा थांबवण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे. केरळविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यादरम्यान मनोज तिवारी यांचे हे वक्तव्य आले आहे. वास्तविक, केरळ आणि बंगालमधील सामना स्टेडियममध्ये नाही तर कॉलेजच्या मैदानात खेळवला जात आहे.

| Updated on: Feb 11, 2024 | 6:58 PM
Share
भारत इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. तर दुसरीकडे, देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. रणजी करंडक ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतील चांगल्या खेळीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. पण आता या स्पर्धेच्या आयोजनावर संताप व्यक्त होत आहे.

भारत इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. तर दुसरीकडे, देशांतर्गत रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. रणजी करंडक ही भारतातील सर्वात जुन्या स्पर्धांपैकी एक आहे. या स्पर्धेतील चांगल्या खेळीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. पण आता या स्पर्धेच्या आयोजनावर संताप व्यक्त होत आहे.

1 / 6
बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीमध्ये एक मोठी गोष्ट उघड केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, पुढील हंगामापासून रणजी ट्रॉफी बंद करून टाकावी. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

बंगाल संघाचा कर्णधार मनोज तिवारीने रणजी ट्रॉफीमध्ये एक मोठी गोष्ट उघड केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे की, पुढील हंगामापासून रणजी ट्रॉफी बंद करून टाकावी. यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

2 / 6
"रणजी टूर्नामेंटमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे पूर्णपणे निराश झालो आहे.", असंही पुढे लिहिलं आहे. तसेच रागवलेला एक इमोजीही पोस्ट केला आहे.

"रणजी टूर्नामेंटमध्ये अनेक गोष्टी चुकीच्या होत आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा वाचवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या स्पर्धेचे महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे पूर्णपणे निराश झालो आहे.", असंही पुढे लिहिलं आहे. तसेच रागवलेला एक इमोजीही पोस्ट केला आहे.

3 / 6
मनोज तिवारीने फेसबुक लाईव्हवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, आम्ही केरळसोबत एकाच मैदानावर खेळत आहोत. आम्ही स्टेडियममध्ये सामने खेळत नाही. इथे चांगले स्टेडियम बांधले आहे, पण आम्ही तिथे सामने खेळत नाही. आम्हाला शहराबाहेर मैदान देण्यात आले आहे.

मनोज तिवारीने फेसबुक लाईव्हवर आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि म्हणाला, आम्ही केरळसोबत एकाच मैदानावर खेळत आहोत. आम्ही स्टेडियममध्ये सामने खेळत नाही. इथे चांगले स्टेडियम बांधले आहे, पण आम्ही तिथे सामने खेळत नाही. आम्हाला शहराबाहेर मैदान देण्यात आले आहे.

4 / 6
ड्रेसिंग रूममध्ये तुम्ही कोणतीही योजना करू शकत नाही. विरोधी संघासह आमची खोली एकमेकांच्या इतकी जवळ आहे की इतर काय म्हणतात ते तुम्ही ऐकू शकता. मला आशा आहे की भविष्यात हे विचारात घेतले जाईल. यावर मी आवाज उठवत आहे, असंही मनोज तिवारी म्हणाला.

ड्रेसिंग रूममध्ये तुम्ही कोणतीही योजना करू शकत नाही. विरोधी संघासह आमची खोली एकमेकांच्या इतकी जवळ आहे की इतर काय म्हणतात ते तुम्ही ऐकू शकता. मला आशा आहे की भविष्यात हे विचारात घेतले जाईल. यावर मी आवाज उठवत आहे, असंही मनोज तिवारी म्हणाला.

5 / 6
सध्याच्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली बंगालचा संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. यापैकी एक सामना संघाने जिंकला आहे तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. मनोज तिवारीने भारतासाठी 12 वनडे सामन्यात 287 धावा केल्या आहेत. तसेच तीन टी20 सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारी बंगाल संघाचे कर्णधार आहे. त्याने 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10124 धावा केल्या आहेत.

सध्याच्या हंगामात मनोज तिवारीच्या नेतृत्वाखाली बंगालचा संघ आतापर्यंत पाच सामने खेळला आहे. यापैकी एक सामना संघाने जिंकला आहे तर तीन सामने अनिर्णित राहिले आहेत. मनोज तिवारीने भारतासाठी 12 वनडे सामन्यात 287 धावा केल्या आहेत. तसेच तीन टी20 सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मनोज तिवारी बंगाल संघाचे कर्णधार आहे. त्याने 146 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 10124 धावा केल्या आहेत.

6 / 6
Follow Us
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?.
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,.
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?.
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर.
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण.
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट.
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा....
विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा.....
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं..
छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले, अन्...' बागेश्वर बाबा नेमकं...