AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचं भवितव्य 6 दिवसात ठरणार! जर तसं झालं नाही तर वनडे संघातून पत्ता कट

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. त्यातही त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. आता रोहित शर्मासाठी सहा दिवस महत्त्वाचे असणार आहेत.

| Updated on: Oct 06, 2025 | 5:03 PM
Share
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. संघाची धुरा बीसीसीआयने शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. रोहित शर्माची संघात निवड करूनही हा बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन युगाचा शेवट झाला आहे. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. संघाची धुरा बीसीसीआयने शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. रोहित शर्माची संघात निवड करूनही हा बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन युगाचा शेवट झाला आहे. (Photo- PTI)

1 / 6
रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब पणाला लावणार आहे. त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी रोहित शर्माला या वर्षात खेळले जाणारे सहा सामने महत्त्वाचे असणार आहेत. (Photo- PTI)

रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब पणाला लावणार आहे. त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी रोहित शर्माला या वर्षात खेळले जाणारे सहा सामने महत्त्वाचे असणार आहेत. (Photo- PTI)

2 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

3 / 6
रोहित शर्माने या सहा सामन्यात चांगली कामगिरी केली तरच त्याला वनडे संघात कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी 6 वनडेतील सहा दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. या सामन्यात अपयशी ठरला तर पुढे संघात निवड होणं कठीण आहे. कर्णधार नसल्याने आता हे गणित सोपं होईल. (Photo- PTI)

रोहित शर्माने या सहा सामन्यात चांगली कामगिरी केली तरच त्याला वनडे संघात कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी 6 वनडेतील सहा दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. या सामन्यात अपयशी ठरला तर पुढे संघात निवड होणं कठीण आहे. कर्णधार नसल्याने आता हे गणित सोपं होईल. (Photo- PTI)

4 / 6
बीसीसीआय वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. यासाठी आता दीड वर्षांचा अवधी आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता रोहित शर्मा या संघात असेल की नाही हे दोन मालिकांमध्ये स्पष्ट होईल. (Photo- PTI)

बीसीसीआय वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. यासाठी आता दीड वर्षांचा अवधी आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता रोहित शर्मा या संघात असेल की नाही हे दोन मालिकांमध्ये स्पष्ट होईल. (Photo- PTI)

5 / 6
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला तर त्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एक संधी दिली जाईल. जर या मालिकेतही त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही तर 2026 मालिकेसाठी त्याची निवड होणं कठीण आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. (Photo- BCCI)

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला तर त्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एक संधी दिली जाईल. जर या मालिकेतही त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही तर 2026 मालिकेसाठी त्याची निवड होणं कठीण आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. (Photo- BCCI)

6 / 6
Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.