AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माचं भवितव्य 6 दिवसात ठरणार! जर तसं झालं नाही तर वनडे संघातून पत्ता कट

रोहित शर्माने टी20 आणि कसोटी संघातून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त वनडे सामने खेळताना दिसणार आहे. त्यातही त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आहे. आता रोहित शर्मासाठी सहा दिवस महत्त्वाचे असणार आहेत.

| Updated on: Oct 06, 2025 | 5:03 PM
Share
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. संघाची धुरा बीसीसीआयने शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. रोहित शर्माची संघात निवड करूनही हा बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन युगाचा शेवट झाला आहे. (Photo- PTI)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा वनडे संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. संघाची धुरा बीसीसीआयने शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. रोहित शर्माची संघात निवड करूनही हा बदल करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील हिटमॅन युगाचा शेवट झाला आहे. (Photo- PTI)

1 / 6
रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब पणाला लावणार आहे. त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी रोहित शर्माला या वर्षात खेळले जाणारे सहा सामने महत्त्वाचे असणार आहेत. (Photo- PTI)

रोहित शर्मा आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये आपलं नशिब पणाला लावणार आहे. त्याला वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याची इच्छा आहे. पण त्यासाठी त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. यासाठी रोहित शर्माला या वर्षात खेळले जाणारे सहा सामने महत्त्वाचे असणार आहेत. (Photo- PTI)

2 / 6
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेत टीम इंडिया तीन सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

3 / 6
रोहित शर्माने या सहा सामन्यात चांगली कामगिरी केली तरच त्याला वनडे संघात कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी 6 वनडेतील सहा दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. या सामन्यात अपयशी ठरला तर पुढे संघात निवड होणं कठीण आहे. कर्णधार नसल्याने आता हे गणित सोपं होईल. (Photo- PTI)

रोहित शर्माने या सहा सामन्यात चांगली कामगिरी केली तरच त्याला वनडे संघात कायम ठेवलं जाईल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी 6 वनडेतील सहा दिवस खूपच महत्त्वाचे आहेत. या सामन्यात अपयशी ठरला तर पुढे संघात निवड होणं कठीण आहे. कर्णधार नसल्याने आता हे गणित सोपं होईल. (Photo- PTI)

4 / 6
बीसीसीआय वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. यासाठी आता दीड वर्षांचा अवधी आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता रोहित शर्मा या संघात असेल की नाही हे दोन मालिकांमध्ये स्पष्ट होईल. (Photo- PTI)

बीसीसीआय वनडे वर्ल्डकप 2027 डोळ्यासमोर ठेवून संघाची बांधणी करत आहे. यासाठी आता दीड वर्षांचा अवधी आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत उतरणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. आता रोहित शर्मा या संघात असेल की नाही हे दोन मालिकांमध्ये स्पष्ट होईल. (Photo- PTI)

5 / 6
रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला तर त्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एक संधी दिली जाईल. जर या मालिकेतही त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही तर 2026 मालिकेसाठी त्याची निवड होणं कठीण आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. (Photo- BCCI)

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरला तर त्याला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एक संधी दिली जाईल. जर या मालिकेतही त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही तर 2026 मालिकेसाठी त्याची निवड होणं कठीण आहे. त्याऐवजी दुसऱ्या खेळाडूंना संधी दिली जाईल. (Photo- BCCI)

6 / 6
Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत