AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8 भागांची भयानक सीरिज, सत्य घटनेचे सीन पाहून अंगावर येतो काटा, 48 वर्षांनंतरही नंबर १ वर ट्रेंड!

अलीकडच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक नव्या वेब सीरिज आणि सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये एक आठ भागांची सीरिज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

| Updated on: Jun 17, 2026 | 6:22 PM
Share
आजकालचे प्रेक्षक फक्त गुन्हा कोणी केला यातच रस घेत नाहीत, तर गुन्हेगाराने असे पाऊल का उचलले आणि त्या गुन्ह्याचा समाजावर किंवा पीडित कुटुंबावर काय परिणाम झाला, हेही जाणून घेण्यात उत्सूक असतात. यामुळे रिअल क्राईमवर आधारित ड्रामा सीरीज आणि खऱ्या घटनांवर प्रेरित कहाण्यांचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. या कहाण्या समाजाच्या काळ्या बाजूला समोर आणतात, ज्याबद्दल सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. याच बदलत्या काळात आणि नव्या ट्रेंडमध्ये वर्ष २०२६ मध्ये एक प्रसिद्ध सीरीज आली आहे, ज्याने सर्वांना हादरुन टाकले आहे.

आजकालचे प्रेक्षक फक्त गुन्हा कोणी केला यातच रस घेत नाहीत, तर गुन्हेगाराने असे पाऊल का उचलले आणि त्या गुन्ह्याचा समाजावर किंवा पीडित कुटुंबावर काय परिणाम झाला, हेही जाणून घेण्यात उत्सूक असतात. यामुळे रिअल क्राईमवर आधारित ड्रामा सीरीज आणि खऱ्या घटनांवर प्रेरित कहाण्यांचा ट्रेंड वेगाने वाढला आहे. या कहाण्या समाजाच्या काळ्या बाजूला समोर आणतात, ज्याबद्दल सामान्य माणूस अनभिज्ञ असतो. याच बदलत्या काळात आणि नव्या ट्रेंडमध्ये वर्ष २०२६ मध्ये एक प्रसिद्ध सीरीज आली आहे, ज्याने सर्वांना हादरुन टाकले आहे.

1 / 5
ही सीरीज १२ जून २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. दिग्दर्शन प्रोसित रॉय, अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांच्या सारख्या कुशल दिग्दर्शकांनी मिळून केले आहे. सीरीजमध्ये अली फजल, सोनाली बेंद्रे, आमिर बशीर, आकाश मखीजा आणि रामदीप यादव सारखे उत्कृष्ट कलाकार दिसत आहेत. सीरीजची कहाणी १९७८ मध्ये दिल्लीत घडलेल्या एका घटनेभोवती विणली गेली आहे. त्या काळात या घटनेने संपूर्ण देशाला हादरवले होते. कहाणीची सुरुवात दोन मुलांच्या अचानक बेपत्ता होण्यापासून होते आणि नंतर हळूहळू एक भयानक गुन्हा उघडकीस येतो.

ही सीरीज १२ जून २०२६ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. दिग्दर्शन प्रोसित रॉय, अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत यांच्या सारख्या कुशल दिग्दर्शकांनी मिळून केले आहे. सीरीजमध्ये अली फजल, सोनाली बेंद्रे, आमिर बशीर, आकाश मखीजा आणि रामदीप यादव सारखे उत्कृष्ट कलाकार दिसत आहेत. सीरीजची कहाणी १९७८ मध्ये दिल्लीत घडलेल्या एका घटनेभोवती विणली गेली आहे. त्या काळात या घटनेने संपूर्ण देशाला हादरवले होते. कहाणीची सुरुवात दोन मुलांच्या अचानक बेपत्ता होण्यापासून होते आणि नंतर हळूहळू एक भयानक गुन्हा उघडकीस येतो.

2 / 5
ही सीरीज पाहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची कहाणी पूर्णपणे खरी आहे. ही सीरीज १९७८ च्या प्रसिद्ध रंगा-बिल्ला अपहरण आणि हत्याकांडावर आधारित आहे. त्या काळात हा घटनेने पूर्ण देशाला हादरवून टाकले होते. सीरीजमध्ये खूप बारकाईने दाखवण्यात आले आहे की, मुलं बेपत्ता झाल्यानंतर पोलिस कशी तपासणी पुढे नेतात. पोलिस फक्त गुन्हेगारांना पकडत नाहीत, तर त्यांच्या वाकड्या मानसिकतेचा देखील अभ्यास करतात. ही सीरीज केवळ रक्तपात दाखवत नाही, तर त्या घटनेचा खरे दुःख आणि वेदना व्यक्त करते.

ही सीरीज पाहण्याचे मुख्य कारण म्हणजे तिची कहाणी पूर्णपणे खरी आहे. ही सीरीज १९७८ च्या प्रसिद्ध रंगा-बिल्ला अपहरण आणि हत्याकांडावर आधारित आहे. त्या काळात हा घटनेने पूर्ण देशाला हादरवून टाकले होते. सीरीजमध्ये खूप बारकाईने दाखवण्यात आले आहे की, मुलं बेपत्ता झाल्यानंतर पोलिस कशी तपासणी पुढे नेतात. पोलिस फक्त गुन्हेगारांना पकडत नाहीत, तर त्यांच्या वाकड्या मानसिकतेचा देखील अभ्यास करतात. ही सीरीज केवळ रक्तपात दाखवत नाही, तर त्या घटनेचा खरे दुःख आणि वेदना व्यक्त करते.

3 / 5
फॉरमॅटच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या सीरीजमध्ये एकूण ८ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड ३५ ते ४७ मिनिटांचा आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या सोयीसाठी सर्व एपिसोड एकाच दिवशी रिलीज केले आहेत. जेणेकरून लोक त्यांना आपल्या सोयीनुसार एकदम पाहू शकतील. हा प्रकार प्रेक्षकांना खूप आवडला. रेटिंगच्या बाबतीतही या सीरीजने चांगली बाजी मारली आहे. IMDb वर तिला १० पैकी ७.८ ची चांगली रेटिंग मिळाली आहे आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरही ५ पैकी सुमारे ४ स्टार्स मिळाले आहेत. समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

फॉरमॅटच्या बाबतीत बोलायचे झाले तर, या सीरीजमध्ये एकूण ८ एपिसोड आहेत. प्रत्येक एपिसोड ३५ ते ४७ मिनिटांचा आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या सोयीसाठी सर्व एपिसोड एकाच दिवशी रिलीज केले आहेत. जेणेकरून लोक त्यांना आपल्या सोयीनुसार एकदम पाहू शकतील. हा प्रकार प्रेक्षकांना खूप आवडला. रेटिंगच्या बाबतीतही या सीरीजने चांगली बाजी मारली आहे. IMDb वर तिला १० पैकी ७.८ ची चांगली रेटिंग मिळाली आहे आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरही ५ पैकी सुमारे ४ स्टार्स मिळाले आहेत. समीक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

4 / 5
समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या सीरीजची भरपूर प्रशंसा केली आहे. लोक कलाकारांच्या अभिनयावर आणि कहाणी मांडण्याच्या रिअलिस्टिक पद्धतीवर भाळले आहेत. अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की, ही २०२६ सालातील सर्वोत्तम क्राईम सीरीजपैकी एक आहे आणि ती ‘पाताल लोक’ सारख्या प्रसिद्ध शोला कडवी टक्कर देते.

समीक्षकांसोबतच प्रेक्षकांनीही या सीरीजची भरपूर प्रशंसा केली आहे. लोक कलाकारांच्या अभिनयावर आणि कहाणी मांडण्याच्या रिअलिस्टिक पद्धतीवर भाळले आहेत. अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की, ही २०२६ सालातील सर्वोत्तम क्राईम सीरीजपैकी एक आहे आणि ती ‘पाताल लोक’ सारख्या प्रसिद्ध शोला कडवी टक्कर देते.

5 / 5
Follow Us
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
डोळ्यात पाणी अन्... tv9शी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भावूक
चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? अंजली दमानिया मैदानात
Anjali Damania | चार्टर्ड विमानातून दिल्ली दौरा, चाललंय तरी काय? आता अंजली दमानिया मैदानात, मागितला हिशोब!
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटी
ठाकरे गट डेमेज कंट्रोलच्या तयारीत; संजय राऊत लोकसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय घडलं?