Photo Gallery : विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी पडली अन् होत्याचं नव्हतं झालं, 6 एकरातील ऊस जळून खाक
लातूर : जिल्ह्यात तोडणीला आलेल्या ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत तर वाया जात आहे. पण पुन्हा त्या जळीत ऊसाचे गाळप होते की नाही हा प्रश्न कायम आहे. सोमवारी जिल्ह्यातील हळद वाढवणा येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे ठिणगी पडल्याने नारायण चव्हाण यांच्या शेतामधील 6 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. नैसर्गिक संकटाचा परिणाम केवळ ऊसावर झालेला नव्हता पण महावितरणच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सुरु आहे. वर्षभर ऊस जोपासून आता या क्षेत्रावर केवळ ऊसाची राख उरलेली आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories