AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : दुष्काळात तेरावा, द्राक्षासह बेदाण्याचे उत्पादनही निसर्गाने हिसकावले, निसर्गापुढे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश

सांगली : द्राक्ष हंगामाची सुरवात आणि शेवटही निसर्गाच्या लहरीपणात गेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. दरवर्षी निसर्गाचा लहरीपणा असतोच यंदा मात्र, सर्व हंगामाच अवकाळीने हिसकावला आहे. द्राक्ष उत्पादनात घट आणि दर्जा ढासळल्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीपेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला होता. पण हे देखील नियतीला मान्य नाही. कारण जिल्ह्यात बेदाणा निर्मीती सुरु असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वकाही उध्वस्त झाले आहे. बेदाणा निर्मितीसाठी उभारण्यात आलेले शेड हे जमिनदोस्त झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात बेदाणा शेडचे पत्रे तर उडून गेलेच पण येथे कामास असलेल्या महिला मजूरही जखमी झाल्या आहेत.

| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 12:32 PM
Share
म्हणून बेदाणा निर्मितीचा निर्णय : यंदा सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे गणितच बिघडले आहे. द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. शिवाय द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री पेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला आहे.

म्हणून बेदाणा निर्मितीचा निर्णय : यंदा सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांचे गणितच बिघडले आहे. द्राक्ष बागांमधून अधिकचे उत्पन्न तर सोडाच पण शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघालेला नाही. शिवाय द्राक्षाच्या दर्जावर परिणाम झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्री पेक्षा बेदाणा निर्मितीवर भर दिला आहे.

1 / 4
हंगाम संपल्यानंतरही नुकसान सुरुच : सध्या द्राक्ष तोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात बेदाणा निर्मितीचे प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेऊन आता ही प्रक्रिया सुरु असतानाच पावासाने लावलेली हजेरी ही नुकसानीची आहे. त्यामुळे हंगाम संपला तरी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

हंगाम संपल्यानंतरही नुकसान सुरुच : सध्या द्राक्ष तोडणी पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात बेदाणा निर्मितीचे प्रोजेक्ट हे सुरु आहेत. बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री घेऊन आता ही प्रक्रिया सुरु असतानाच पावासाने लावलेली हजेरी ही नुकसानीची आहे. त्यामुळे हंगाम संपला तरी अवकाळी पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही.

2 / 4
पोषक वातावरणही नाही : बेदाणा निर्मितीसाठी कोरडे वातावरण आणि उन्ह असणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांपासून ज्या भागात बेदाणा निर्मिती होत आहे त्याच भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि आता बेदाण्याचे नुकसान होत आहे.

पोषक वातावरणही नाही : बेदाणा निर्मितीसाठी कोरडे वातावरण आणि उन्ह असणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. एवढेच नाही तर दोन दिवसांपासून ज्या भागात बेदाणा निर्मिती होत आहे त्याच भागात अवकाळीने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष आणि आता बेदाण्याचे नुकसान होत आहे.

3 / 4
महिला मजूरही जखमी: कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथे बेदाणा निर्मिती केली जात होती. पण सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेडवरील पत्रे तर उडून गेलेच पण यामध्ये महिला मजूर यादेखील जखमी झाल्या. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेड मालकांनी केली आहे.

महिला मजूरही जखमी: कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथे बेदाणा निर्मिती केली जात होती. पण सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये शेडवरील पत्रे तर उडून गेलेच पण यामध्ये महिला मजूर यादेखील जखमी झाल्या. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेड मालकांनी केली आहे.

4 / 4
Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.