AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर राबल्यानंतर ‘त्या’ महिलांची अंधाऱ्या रात्री पाण्यासाठी वणवण; आर्थिक राजधानीच्या हाकेच्या अंतरावरचं भयानक वास्तव

राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईमुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. ग्रामीण भागातील या महिला दिवसा राबून रात्री पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत.

| Updated on: Apr 12, 2025 | 12:09 PM
Share
राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

1 / 6
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

2 / 6
टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

3 / 6
या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

4 / 6
विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

5 / 6
पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.

पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.

6 / 6
Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा