AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसभर राबल्यानंतर ‘त्या’ महिलांची अंधाऱ्या रात्री पाण्यासाठी वणवण; आर्थिक राजधानीच्या हाकेच्या अंतरावरचं भयानक वास्तव

राज्यात कडक उन्हाळा सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईमुळे सर्वाधिक त्रास महिलांना होत आहे. ग्रामीण भागातील या महिला दिवसा राबून रात्री पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत.

| Updated on: Apr 12, 2025 | 12:09 PM
Share
राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

राज्यात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. दिवसभर शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री पाण्यासाठी वणवण करायची असं भयाण चित्र राज्यभर दिसत आहे.

1 / 6
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात तर पाण्याची भीषण स्थिती दिसत आहे. पाणीच मिळत नसल्याने ग्रामस्थांना रात्री पाणी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडा तालुक्यातील अवघ्या 40 घरांची वस्ती असलेल्या गावठाण पाड्यात पाणीच नाहीये, त्यामुळे या महिलांना दिवसा मोलमजुरी करून रात्री पाण्याच्या शोधात पाड्याच्या बाहेर पडावं लागत आहे.

2 / 6
टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

टीव्ही9ची टीम गावठाण पाड्यात रात्री 2 वाजता पोहोचली. त्यावेळी अख्ख्या गावात काळाकुट्ट अंधार होता. पण पाड्यापासून दूर हाकेच्या अंतरावर महिलांचा आवाज येत होता. भांड्यांचाही आवाज येत होता. त्यामुळे आमची टीम त्या दिशने गेली. तेव्हा बॅटरीच्या उजेडात काही महिला विहिरीवर पाणी भरताना दिसल्या.

3 / 6
या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

या महिला रात्रभर पाण्यासाठी जाग्या राहतात. प्रत्येक महिलेला दोन हांडे मिळतात. याच पाण्यावर आमचा पूर्ण दिवसाचा दिनक्रम करावा सुरू होतो, असं या महिला सांगतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत महिलांची पाण्यासाठी धडपड सुरु राहते. दिवसा प्रचंड ऊन असल्याने पाणी मिळत नाही. विहिरीने तळ गाठला आहे. पिण्यासाठी जेमतेम पाणी मिळते. अंघोळीला तर पाणीच मिळत नाही, असंही या महिला सांगतात.

4 / 6
विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

विहिरीवर पाण्यासाठी महिलांची चढाओढ सुरु असते. त्यांच्यासोबत लहान लहान मुलीही असतात. विंचू काट्याची भीती वाटत नाही. कारण पाणी हवंय. अगोदर गेलेल्या महिला पाणी आणल्यानंतर दुसऱ्या महिला पाण्यासाठी विहिरीवर नंबर लावतात. प्रत्येकीला पाणी मिळेल याची खबरदारी या महिला घेत असतात.

5 / 6
पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.

पाणी टंचाईबाबत ग्रामस्थांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. मात्र प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. लोकप्रतिनिधींनी सुद्धा या समस्येकडे कानाडोळा केल्या. आज या महिलांना पाण्यासाठी रात्र काढावी लागते. विकास होतच राहील. पण आम्हाला पाणी कधी देणार? असा सवाल हे ग्रामस्थ करत आहेत.

6 / 6
Follow Us
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा
युद्धाचा मोठा फटका; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या रांगा.
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान
गडचिरोली : अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका, पिकांचे मोठे नुकसान.
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते
धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप; मोठे नेते मला संपवण्याच्या प्रयत्नात होते.
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चाकणकर यांचा राजीनामा घ्या, संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा
भोंदूबाबा अशोक खरात यांच्या मालमत्तेवर पोलिसांचा छापा.
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी
खरात यांना नाशिक पोलिसांकडून अटक; समर्थकांकडून पत्रकारांना दमदाटी.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर APMC मार्केटमध्ये आंब्याच्या पेट्या दाखल.
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला
मुंबईतील गिरगावात शोभायात्रेचा उत्साह, तरूणाईचा उत्साह शिगेला.
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन
गुढीपाडव्याचा उत्सव; राज ठाकरे आणि कुटुंबियांकडून गुढीचं पूजन.
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला
चाकणकर मूर्ख, खोट बोलत आहेत, चाकणकरांवर संजय राऊत यांचा जोरदार हल्ला.