AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?

India vs Australia Odi Series 2025 : बीसीसीआय निवड समितीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन हटवलं आहे.

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित-विराटचं कमबॅक, पहिला सामना केव्हा?
Virat Rohit and Shubman Gill Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Oct 04, 2025 | 3:42 PM
Share

टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज विरुद्ध मायदेशात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. टीम इंडिया या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान वनडे आणि टी 20I सीरिज खेळणार आहे. उभयसंघातील एकदिवसीय मालिकेत एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर टी 20I मालिकेत 5 सामन्यांचा थरार रंगणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया

बीसीसीआयने रोहित शर्मा याचा एकदिवसीय कर्णधारपदावरुन पत्ता कट केला आहे. तर शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच विराट कोहली याचंही एकदिवसीय संघात कमबॅक झालं आहे. टीम इंडियाने याआधी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायलनमध्ये 9 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. भारताचा हा शेवटचा एकदिवसीय सामना होता. त्यानंतर आता 7 महिन्यांनी भारतीय संघ एकदिवसीय सामने खेळणार आहे. चाहत्यांना रोहित-विराटच्या कमबॅकची प्रतिक्षा होती. आता ही प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे.

श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी

निवड समितीने टीम भारताच्या कर्णधारासह उपकर्णधारही बदलला आहे. शुबमनला उपकर्णधारपदावरुन कर्णधार करण्यात आलं. त्यामुळे आता शुबमननंतर श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रेयस एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार होता. रोहितनंतर श्रेयसला कॅप्टन करण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र ही फक्त चर्चात ठरलीय.

दोघांना पदार्पणाची संधी मिळणार?

तसेच एकदिवसीय संघात नव्या दमाच्या खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. या खेळाडूंमध्ये नितीश कुमार रेड्डी आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांचं अद्याप एकदिवसीय पदार्पण झालेलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पदार्पणाची संधी मिळणार का? याची प्रतिक्षा या दोघांना असणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, रविवार, 19 ऑक्टोबर, पर्थ

दुसरा सामना, मंगळवार, 23 ऑक्टोबर, एडलेड

तिसरा आणि अंतिम सामना, शनिवार, 25 ऑक्टोबर, सिडनी.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.