महाडच्या तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. तुफान पावसामुळे काल, गुरुवार संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास या गावावर दरड कोसळली आहे. गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. स्थानिकांनी आतापर्यंत मातीच्या या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले आहेत. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, या ढिगाऱ्याखाली आणखी 40 ते 45 मृतदेह अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.