महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर सांगली साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय. तर आंबेघरमध्ये सुद्धा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आता याठिकाणी जिल्हाधिकारी शेखर सिंग आंबेघरमध्ये दाखल झाले आहेत. सोबतच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.