राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गट विरूध्द शिवसेना असा सामना राज्यात रंगताना दिसतोयं. कल्याणमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलायं. यामुळे एकच खळबळ उडालीयं. हा हल्ला नेमक्या कशामुळे आणि कोणत्या कारणाने करण्यात आलायं. हे अघ्याप कळू शकले नाहीयं. मात्र, हा हल्ला राजकिय कारणामुळेच झाला असल्याचा अंदाज वर्तवला जातोयं. या हल्लात हर्षवर्धन पालांडे यांना मोठी दुखापत झाली असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरूयं. हल्लात त्यांच्या हाताच्या दोघ बोटांना गंभीर दुखापत झाल्याचे कळते आहे.