Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत…
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाबाबत मोठे संकेत दिले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाबाबत मोठे संकेत दिले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर आता विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
यावर भाष्य करताना आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनीच नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच देशाच्या पातळीवर म्हणजेच दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची राहील असंही कडू म्हणाले.
संजय राऊत यांच्या भविष्यवाण्या यापूर्वीही खऱ्या ठरल्या नसल्याचे सांगत बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली. राऊतांनी कोणत्या ज्योतिषाकडे हात दाखवला हे माहीत नाही, असा टोला देखील बच्चू कडू यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाऊ शकतात, तर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम चेहरा ठरू शकतात, असे आज पत्रकार परिषदेत म्हटले होते. या विधानामुळे राज्यातील राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
