Bangladesh : भारत-पाकिस्तानच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ, ईशान्य भारतावर कब्जा…

Bangladesh : भारत-पाकिस्तानच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ, ईशान्य भारतावर कब्जा…

| Updated on: May 01, 2025 | 12:10 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, एका निवृत्त बांगलादेशी मेजर जनरलने एक वादग्रस्त विधान केले आहे. बघा काय दिली भारताला धमकी?

पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, एका निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले आहे. आता पाकिस्नावर भारताने हल्ला केल्यास बांगलादेशाने भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा, असं वक्तव्य मेजर जनरल फजलुर रहमान याने केलंय. निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने भारताला एक प्रकारे धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे. बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमानने वादग्रस्त वक्तव्य करताना भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारशी असलेले त्यांचे जवळचे संबंध पाहता हे विधान चिंतेचा विषय आहे. यामुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Published on: May 01, 2025 12:10 PM