आम्ही युवा वॉरियर ही संकल्प यात्रा मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून सूरु केली. तितल्याच युवकांचे प्रश्न मार्गी लागलेले नाहीयेत.असंख्य युवा वर्ग आमच्याशी जोडला जातोय त्यांच्या समस्या सांगतोय. संपूर्ण महाराष्ट्रात आमचा हा दौरा सुरुय. पुरग्रस्त जिल्हे सोडले तर सगळीकडे आम्ही दौरा केला आणि युवकांना पक्षाशी जोडलं. युवकांना फक्त आश्वासनं दिली गेली त्यांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. मुख्यमंत्री असतील, पवार घराणं असेल फक्त स्वतःच्याच मुलांचं करियर घडवताय, इतर युवा वर्ग पिचलेला आहे. म्हणून आम्ही युवकांना स्वतःसोबत जोडून घेतोय, असं वक्तव्य भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी केलं.