Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले…
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये महत्त्वाची माहिती दिली. 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 5 जुलैची तारीख देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रक्रिया थोडी उशिराने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये महत्त्वाची माहिती दिली. 30 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 5 जुलैची तारीख देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे प्रक्रिया थोडी उशिराने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पुरवणी मागण्यांमधील आर्थिक तरतुदींना मंजुरी मिळाल्यानंतर राज्यपालांची सही होईल. त्यानंतर लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येईल, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
शेतकरी इन्कम टॅक्स संदर्भात 100% पडताळणी करूनच निर्णय घेतला जाईल. गरीब आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळावा यासाठी सरकार काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवस उशीर झाला तरी कोणतीही चूक होऊ नये यासाठी सर्व माहिती तपासली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी निवडणूक नसतानाही शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी आभार मानावेत, असेही त्यांनी म्हटले.
