फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, ‘त्या’ विधानाची सर्वत्र चर्चा

| Updated on: Jul 14, 2026 | 4:54 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राहुल गांधी यांनी पेपर फुटीवरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. त्याचवेळी ते शेतकरी कर्जमाफी योजनेचा कसा फायदा होणार आहे हे सुद्धा त्यांनी विस्ताराने सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा रामरक्षा आंदोलनावरुन टीका केली.

रामरक्षा आंदोलनावरुन त्यांनी उद्धव ठाकरेंचा सुद्धा समाचार घेतला. “माझी एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी किमान दोन पान रामरक्षेची वाचावी. रामाच्या नावाने आंदोलन करणं योग्य नाही. मागच्यावेळी ते रामरक्षा वाचू शकले नव्हते. त्यांची तयारी असेल तर मी सुद्धा त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा येत नसती, तर किमान वाचता तरी आली पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षा वाचता येत नाही. कुठलं आंदोलन आहे तुमचं” अशा शब्दात त्यांनी टीका केली. उद्धव ठाकरे हे हताश, फ्रस्ट्रेड व्यक्ती आहेत अशी टीका सुद्धा फडणवीसांनी केली.

Published on: Jul 14, 2026 4:38 PM
Follow Us