मुंबई: “राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याकरिता मी प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली. ते म्हणाले, “पुढचा प्रवास किती खडतर आहे, याची मला कल्पना होती. खासदारकी असतानाही समाजाची मी प्रांजळपणाने भूमिका मांडत होतो. मी पार्श्वभूमी पाहून मी सगळ्या पक्षांना विनंती केली होती. त्यासाठीच मी मुंबईत आलो होतो. दोन खासदार आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मला शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली. मात्र मी अपक्ष म्हणून उभे राहण्यावर ठाम होतो”, असं संभाजीर राजे म्हणाले.