वाशिम : राज्यात अनेक ठिकाणी वीजतोडणी करण्यात आलीय. थकीत वीजबिलं भरावी यासाठी महावितरणाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. माात्र याचा थेट फटका रब्बीच्या पिकांना आणि शेतकऱ्यांना बसत आहे, बीज तोडणीमुळे पिकांना पाणी कसं द्यायंचं असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतातली पिक शेतातच करपू लागली आहेत. त्यामुळे हातातोंडाला आलेली पिकं गमावण्याची भिती बळीराजाला वाटतेय. शासनानं बळीराजाच्या पिकांचा विचार करून महावितरणाला वीज जोडणीचे आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनाकडून करण्यात येतोय. वीज तोडणीविरोधात शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी आंदोलनही करण्यात आली आहेत.