नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यात राज्यपाल पर्यायी शासन व्यवस्था चालवत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीत तक्रार केली. 12 विधानपरिषद आमदारांची नियुक्ती अजूनही नाही, राज्यपालांनी संयुक्तिक काम करावं. राज्यात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, पण म्हणावी तशी मदत मिळाली नाही. देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र राज्य देत – GST परतावा लवकर मिळावा, अशी खासदार राऊत यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे मागणी केली आहे.