नागपूरच्या नरखेड परसोडी येथे एकाच कुटुंबातील 6 जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. आमरस आणि पुरणपोळी खाल्यानंतर ही विषबाधा झाल्याचे वैद्यकिय तपासणीत समोर आले आहे. विषबाधा झालेल्या 6 जणांत 4 लहान मुलांचा देखील समावेश आहे. या सर्वांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.