जून महिना संपत आता जुलै महिना जवळपास उजाडला आहे. दरम्यान हवा तसा पाऊस अद्यापही सुरु झाला नसल्याने राज्यभरात बळीराजांसह सामान्य नागरिकही चिंतेत सापडले आहे. एकीकडे कोरोनाचा धोका आणि पावसाचा लंपडाव यात अडकलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र हवामान विभागाने पुढील 6 ते 7 दिवस पावासाचा अंदाज वर्तविला आहे.